Tuesday 28 June 2016

के एल राहुल

के एल राहुल कर्नाटकचा एक युवा खेळाडू. कर्नाटकच्या संघातीलएक महत्वाचा खेळाडू. २०१०-११ च्या मोसमात पदार्पणात हवी तशी कामगिरी करता न आल्यामुळे पुढच्या मोसमात संघात स्थान मिळाले नाही पण मेहनतीच्या जोरावर २०१२-१३ च्या सत्रात संघात स्थान मिळविले आणि संघाचा महत्वाचा खेळाडू म्हणून स्थान राखले. राहूलने २०१३-१४ च्या सत्रात रणजीमध्ये एक हजारपेक्षा अधिक धावा ठोकल्या आणि २०१३-१४ व २०१४-१५ या सलग दोन सत्रात कर्नाटकला रणजीचे विजेतेपद मिळविण्यात महत्त्वाची कामगिरी केली.
देशांतर्गत स्पर्धेतल्या कामगिरीच्या जोरावर त्याने भारताच्या कसोटी संघात स्थान मिळविले तेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत. पहिल्या सामन्यात साजेशी कामगिरी करता आली नाही पण सिडनितल्या कसोटीत सलामीला येताना ११० धावांची खेळी केली. तसेच श्रीलंकेविरुद्ध मालिकेत जखमी धवनच्या जागी राहुलला सलामीची संधी मिळाली आणि मिळालेल्या संधीचा पुरेपुर फायदा उठवत शतकाला गवसणी घातली आणि भारतीय संघाला मालिकेत बरोबरी साधुन दिली. त्यासामन्यात एका फलंदाजाबरोबरच यष्टीरक्षकाची भुमिका पार पाडली. धोनीने कसोटीतुन निवृत्ती घेतल्यामुळे भारताला एका चांगल्या यष्टीरक्षाकाची व फलंदाजाची कमतरता भासते. सध्या वृद्धीमान साहा यष्टीरक्षकाची भुमिका पार पाडतो पण त्याच्या फलंदाजीबाबत साक्षंकता आहेत्यामुळे जर राहुलच्या कामगिरीत सातत्य राखले तर तो साहाची जागा घेऊ शकतो.
कामगिरीत राखलेल्या सातत्याने राहुलचा आयपीएलच्या बॅंगलोर संघात समावेश समावेश करण्यात आला त्यानंतर राहुलने २०१४ साली आयपीएल मध्येहैदराबादचे नेतृत्व केले आणि २०१६ मध्ये बॅंगलोरला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची भुमिका निभावली. २०१६ च्या सत्रात राहुलने ३९७ धावा ठोकल्या याच कामगिरीच्या जोरावर त्याची झिम्बावे दौय़ावर जाणाऱ्याएकदिवसीय व टी-२० संघात तसेच वेस्ट इंडिज दौय़ावर जाणाय़ा कसोटी संघात निवड झाली. राहुलने झिम्बावेविरुद्ध खेळलेल्या पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी आणि भारताकडुन पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात शतकीखेळी करणारा पहिला खेळाडू ठरला तसेच राहुलला पदार्पणाच्या मालिकेत मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. परंतु टी-२० च्या पहिल्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला.
      वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत राहुलला संधी मिळेल की नाही असे वाटत होते पण पहिल्या सामन्यात मुरली विजय जखमी झाला आणि त्या जागी धवन सोबत राहुल सलामीला आला आणि याचा पुरेपुर फायदा उठवत त्याने १५८ धावांची खेळी करत भारताला मोठी धावसंख्या उभारुन दिली त्याच बरोबर एक अर्धशतक सुद्धा झळकावले. कसोटी मालिकेनंतर अमेरिकेत झालेल्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने २४५ धावांचा डोंगर उभा केला होता. २४५ चा पाठलाग करताना भारतीय संघ २ बाद ४८ अशा स्थितीत होता त्यानंतर रोहित शर्मा व राहुलने तीसऱ्या गड्यासाठी ८९ धावांची तर चौथ्या गड्यासाठी राहुलने धोनीसोबत १०७ धावांची भागिदारी केली यात राहुलने आपले पहिले टी-२० शतक झळकावले अशी कामगिरी करणारा राहुल रैना व रोहित शर्मानंतर तीसरा खेळाडु ठरला.
      वेस्ट इंडिजविरुद्धच्या कामगिरीनंतर राहुलला विजयसोबत न्युझिलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलामीला खेळण्याची संधी मिळाली. पहिल्या कसोटीत दोन्ही डावात संघाला धडाकेबाज सुरुवात करुन दिली पण दुखापतीमुळे त्याला उर्वरीत कसोटी व एकदिवसीय मालिकेला मुकावे लागले. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने पुनरागमन केले याच मालिकेतील चेन्नई येथे झालेल्या पाचव्या व शेवटच्या कसोटीत ३११ चेंडूत १९९ धावांची अनोखी खेळी खेळली यात त्याने १६ चौकार व ३ षटकार मारले. तसेच पार्थिव पटेलसोबत १५२ धावांची सलामी भागिदारी केली तर करुण नायरसोबत १६१ धावांची चौथ्या गड्यासाठी भागिदारी केली आणि संघाला पहिल्या डावात मोठी आघाडी मिळवुन दिली व भारताने ४-० ने मालिका खिशात घातली. पण जर त्याला संघात कायम राहायचे असेल तर त्याला कामगिरीत सातत्य टिकवावे लागेल.


शंतनु कुलकर्णी

Sunday 26 June 2016

मनीष पांडे

मनीष पांडे देशांतर्गत पातळीवरील एक महत्वाचे नाव. राष्ठ्रीय पातळीवर कर्नाटकचे नेतृत्व करत खोऱ्याने धावा काढणारा खेळाडू. पहिल्यांदामनीष पांडेने आपली झलक दाखवली ती २००८ साली मलेशियात झालेल्या १९वयोगटाच्या विश्वचषकात जेव्हा भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वात विजेतेपदाला गवसनी घातली. या कामगिरीच्या जोरावर त्याने आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघात स्थान मिळविले परंतु पाहिजे तितकी संधी मिळाली नाही पण आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात त्याला बॅंगलोर संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने संधीचा पुरेपुर फायदा उठवला. याच सत्रात त्याने ७३ चेंडूत नाबाद ११४ धावांची खेळी करून आयपीएलमधील पहिला भारतीय शतकवीराचा मानही मिळवला तसेच या खेळीने संघाला उपांत्य फेरीत धडक मारून दिली. सलग दुसय़ा सामन्यात ४८ धावांची खेळी करून संघाला अंतिम सामन्यात नेऊन ठेवले.
मनीष पांडेने देशांतगर्रत स्पर्धेच्या प्रत्येक स्पर्धेत धावांचा डोंगर उभा केला. २००९-१० च्या रणजी मोसमात त्याने चार शतके आणि पाच अर्धशतकांच्या सहाय्याने सर्वाधिक ८८२ धावा ठोकल्या. याच रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कर्नाटकला ३३८ धावांची आवश्यकता होती त्यात मनीषने १४४ धावांची खेळी केली पण ही खेळी मुंबईला विजेतेपदापासुन रोखू शकली नाही. मनीषने एक उत्कृष्ट फलंदाजाबरोबरच एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणूनही आपला ठसा उमटवला आहे. २०१२ व २०१४ साली कोलकत्ता संघाला आयपीएल चषक जिंकवण्यात मनीष पांडेचा मोलाचा वाटा होता त्यात २०१४ च्या अंतिम सामन्यात पंजाबविरूद्ध २०० धावांचे लक्ष्य असताना ५० चेंडूत ९४ धावांची खेळी करून संघाला विजय प्राप्त करून दिला.
२०१५ साली मनीष पांडेला पहिल्यांदा भारतीय संघात स्थान खेळण्याची संधी मिळाली ती झिंबाब्वे विरूद्ध आणि पहिल्याच सामन्यात केदार जाधव सोबत महत्त्वाची भागिदीरी करुन अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर त्याला संधी मिळाली ती ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर त्याला संघाबाहेर बसावे लागले परंतु अजिंक्य रहाणे जखमी झाल्याने मनीषला शेवटच्या सामन्यात संधी मिळाली. भारताने आधीच मालिका गमवली होती पण व्हाईटवॉश रोखण्यासाठी विजय महत्त्वाचा होता. भारताला विजयासाठी ३३१ धावांची आवश्यकता होती त्यामुळे भारताला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती पण चांगल्या सुरुवातीनंतर भारताने दोन फलंदाज झटपट गमावले पण रोहित शर्मा व मनीष पांडेने ९७ धावांची महत्त्वाची भागिदारी केली आणि मनीष पांडेने धोनी बरोबर ९४ धावांची भागिदारी केली व शेवटी मनीषने भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात मनीषने नाबाद १०४ धावांची खेळी केली ती फक्त ८१ चेंडूत. या कामगिरीच्या जोरावर त्याला झिंबाब्वे विरूद्धच्या संघात स्थान मिळाले पण त्याला हवी तितकी फलंदाजीची संधी मिळाली नाही.
      ऑस्ट्रेलियाविरूद्ध शेवटच्या सामन्यात शतकी खेळी करुन संघाला विजय मिळवुन दिल्यानंतर संघाला मधल्या फळीसाठी एक पर्याय दिला. त्यानंतर २०१६ च्या आयपीएल सत्रात १२ सामन्यात २४८ धावा काढल्या. त्यानंतर झिम्बाब्वेविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही पण टी-२० मालिकेतल्या पहिल्या सामन्यात ४८ धावा काढल्या खऱ्या पण तो भारताला विजय मिळवुन देण्यात अपयशी ठरला व भारताने २ धावांनी सामाना गमावला.

      २०१६ च्या न्युझिलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी मनीषचा संघात समावेश करण्यात आला तसेच धवनच्या अनुपस्थितीमुळे रहाणे सलामीला खेळल्याने पांडेला मधल्या फळीत खेळण्याची संधी मिळाली पण संधीचा फायदा उठवण्यात तो पुर्णपणे अपयशी ठरला आणि ४ डावांत फक्त ४८ धावा काढल्या. सद्यस्थितीत जर एखाद्या खेळाडुला संघातील स्थान टिकवायचे असेल तर कामगिरीत सातत्य असावे लागते कारण नवनवीन युवा खेळाडु जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवण्यास आतुर आहेत. एकदा संघातील स्थान गमावले की पुन्हा संघात संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे मनीषला कामगिरीत सातत्य टिकवावे लागेल. त्यामुळे येत्या काळात त्याच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल.
शंतनु कुलकर्णी