Tuesday 5 December 2017

रविंद्र जडेजा

सध्याच्या भारतीय संघाच्य़ गोलंदाजीचा महत्त्वाचा घटक. गुजरातमध्ये जन्मलेल्या या खेळाडुने कमी वयातच सौराष्ट्राच्या रणजी संघात प्रवेश मिळवला. घरची परिस्थिती बेताची असताना जडेजाने परिश्रम करुन जागतिक क्रिकेटमध्ये आपले नाव कमावले. वयाच्या १६ व्या वर्षी त्याने भारताच्या युवा संघात स्थान मिळवले आणि २००६ व २००८ साली आलेल्या युवा विश्वचषकामध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व केले. जिथे एखाद्या खेळाडुला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत नाही तिथे जडेजाने दोनदा युवा विश्वचषकात खेळला. २००६ मध्ये त्याला इतकी संधी मिळाली नाही पण पाकिस्तानविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात १६ धावांत ३ गडी बाद केले आणि याची पुनरावृत्ती त्याने २००८ च्या विश्वचषकात करत भारताला विश्वचषकात करत भारताला विश्वचषक जिंकुन देण्यात हातभार लावला.
युवा विश्वचषकात केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याला २००८ व २००९ मध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सचे आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. यातील २००८ मध्ये राजीस्थानने विजेतेपदकाला गवसणी घातली त्यात अष्टपैलु रविंद्र जडेजाचा मोलाचा वाटा होता. रविंद्र जडेजाने कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघात प्रवेश मिळवला आणि पहिल्याच एकदिवसीय सामन्यात अर्धशतकी खेळी केली. २०१२ मध्ये जडेजा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तीन त्रिशतके झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज बनला यासोबतच तो डॉन ब्रॅडमन, ब्रायन लारा, डब्लु जी ग्रेस, माईक हसी, ग्रॅहम हीक, बील पॉनसफोर्ड, वॉल्टर हॅमंड यांसारख्या दिग्गजांच्या यादीत जाऊन बसला महत्त्वाची बाब म्हणजे त्याने हा पराक्रम वयाच्या २३ व्या वर्षी केला. तीन त्रिशतकांमधील दोन त्रिशतके त्याने २०१२ च्या सत्रात केली याच कामगिरीच्या जोरावर त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी पदार्पणाची संधी मिळाली.२००८-०९ च्या रणजी मोसमात त्याने ४२ बळी व ७३९ धावा फटकावत अष्टपैलु कामगिरी करत भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळवले परंतु २००९ च्या टी-२० विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील कामगिरीमुळे त्याला टिकाकारांना सामोरे जावे लागलेहोते.
कसोटी मालिकेनंतर झालेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात जडेजाने ६१ धावांची आक्रमक खेळी केली ती फक्त ३७ चेंडूत तसेच गोलंदाजीत १२ धावांत २ गडी बाद करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. परंतु जडेजाच्या कारकिर्दीला खरी कलाटणी दिली ती २०१३ मध्ये भारताने मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेला ४-० ने विजय या मालिकेत जडेजाने तब्बल २४ गडी बाद केले त्यात त्याने ५ वेळेस ऑस्ट्रेलियाचा कर्णधार राहिलेल्या मायकेल क्लार्कला आपला बकरा बनवला. यातील शेवटच्या सामन्यातील दुसऱ्या डावात ५ बळी घेत सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावे केला.
      त्यानंतर २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीत विजय संपादन करण्यात जडेजाने महत्तवाची भुमिका निभावली. या स्पर्धेत त्याने सर्वाधिक १२ गडी बाद करत "गोल्डन बॉल" चा मानकरी ठरला यात वेस्ट इंडिजविरुद्ध ३६ धावा देत ५ गडी तसेच अंतिम सामन्यात नाबाद ३६ व २४ धावा देत २ गडी सुद्धा बाद केले. या कामगिरीनंतर जडेजाने आयसीसीच्या गोलंदाजांच्या एकदिवसीय क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला. याआधी भारताकडुन कपिल देव, मनिंदर सिंग व अनिल कुंबळेने भारताकडुन क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला होता.आयपीएलमध्ये जडेजाने २००८-०९ मध्ये राजस्थान रॉयल्सचे, २०११ मध्ये कोची तस्कर्सचे प्रतिनिधित्व केले पण २०१२ च्या सत्रासाठी झालेल्या बोलीत चेन्नई सुपरकिंगने जडेजाला तब्बल २० ताख डॉल्रर्सला खरेदी केले. २०१२-१५ या ४ सत्रापैकी ३ वेळेस संघाला आपल्या कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरीत घेऊन गेला. याच काळात जडेजा "सर जडेजा" म्हणून ओळखला जाऊ लागला आणि धोनीचा विश्वासु खेळाडू बनला.
      २०१५ हे वर्ष जडेजासाठी तितकेसे लाभदायक ठरले नाही. २०१५ च्या विश्वचषकात त्याची कामगिरी सरासरी झाली मग ती गोलंदाजीत असो वा फलंदाजीत. विश्वचषकानंतर बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेत केलेल्या खराब कामगिरीमुळे त्याला संघातले स्थान गमवावे लागले. परंतु जडेजाने अपयश विसरुन रणजी मोसमात जोरदार कामगिरी करत ४ सामन्यांत ३८ विकेट घेतल्या यांत ६ वेळेस एका डावात ५ गडी बाद केले तसेच फलंदाजीत ३ अर्धशतके झळकावत २१५ धावा फटकावल्या. या कामगिरीच्या जोरावर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पुनरागमन केले आणि या मालिकेत त्याने रणजी सामन्यांप्रमाणेच गोलंदाजीत आपला जलवा दाखवत चार सामन्यांत २३ बळी घेतले व खालच्या क्रमांकावर महत्त्वाच्या खेळी केल्या.
      २०१६ साली न्युझिलंडविरुद्धच्या मालिकेतही त्याने आपला अष्टपैलु खेळ दाखवला व कानपुर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीसामन्यांत ६ बळी व १२ धावा अशी कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. न्युझिलंडविरुद्धच्या मालिकेप्रमाणेच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अश्विन व जडेजाच्या फिरकीचा दबदबा राहिला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अश्विनने २८ तर जडेजाने २६ विकेट घेत इंग्लंडच्या फलंदाजीतली हवाच काढली. यात चेन्नई येथे झालेल्या शेवटच्या कसोटीत भारताला अखेरच्या दिवशी १० गडी बाद करण्याची आवश्यकता होती. एकवेळ इंग्लंड संघ २ बाद ११० अशा स्थितीत होतो पण जडेजाच्या फिरकीने त्यांची कंबरच मोडली आणि त्यांचा डाव २०७ धावांत आटोपला व भारताने ४-० ने मालिका खिशात घातली. या सामन्यांत जडेजाने १० बळी व धडाकेबाज अर्धशतकही झळकावले. या संपुर्ण मालिकेत गोलंदाजीबरोबरच खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन २२४ धावांचे योगदान सुद्धा दिले.जडेजा हा त्याच्या गोलंदाजी शैलीने च्रर्चेत राहतो तो फलंदाजांना दोन चेंडूमधील वेळेत विचार सुद्धा करण्याची संधी देत नाही आपले षटक पटकन पुर्ण करतो त्यामुळे फलंदाजांवर दडपण निर्माण होते.

No comments:

Post a Comment