Tuesday 5 December 2017

शिखर धवन

सेहवाग,गंभीर सोबतच दिल्लीचा आणखी एक आघाडीचा फलंदाज. आपल्या ताबडतोड फलंदाजीने त्याने सर्वांचे लक्ष वेधले.धवनचे पहिल्यांदा नाव आले ते २००४ मध्ये बांग्लादेशमध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात ज्यात त्याने ५०५ धावा फटकवल्या आणि भारताला अंतिम फेरीत धडक मारुन दिली. भारताला अंतिम फेरीत पराभव स्विकारावा लागला पण तो मालिकावीराचा मानकरी ठरला.तसेच तो देशांतर्गत स्पर्धांमध्ये खोऱ्याने धावा काढत होता.आ­­­­यपीएलच्या सुरुवातीच्या वर्षात त्याला सेहवाग,गंभीरसोबत दिल्ली डेयरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली यात त्याने भरपुर धावा केल्या.
त्याला आंतरराष्ट्रीय संघात संधी मिळाली ती २०१० साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत.पदार्पणात कामगिरी करता आली नाही पण त्याने देशांतर्गत स्पर्धात जोमाने कामगिरी केली या कामगिरीचे बक्षिस म्हणून त्याला सलामीवीर म्हणून संधी मिळाली ती २०११ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात त्यात त्याला फक्त एका अर्धशतकाच्या मदतीने ५८ धावा करता आल्या आणि पुन्हा संघाबाहेर व्हावे लागले. परंतु त्याची देशांतर्गत स्पर्धेतील कामगिरी आणि सेहवाग व गंभारची अपयशी मालिका बघता त्याला पुन्हा संधी मिळण्याची आशी होती.
      २०१३ च्या रणजी ट्रॉफी तसेच इराणी ट्रॉफीतल्या कामगिरीच्या जोरावर सेहवागच्या जागी त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला.पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्याने १८७ धावा केल्याआणि भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी घेऊन विजय मिळवण्यात महत्त्वाची भुमिका बजावली.पण क्षेत्ररक्षण करताना झालेल्या दुखापतीने त्याला दुसऱ्या डावात फलंदाजी करता आली नाही व शेवटच्या कसोटीला मुकावे लागले.धवनने आयपीएल मध्ये दिल्ली,मुंबई तसेच सध्या हैद्राबादचा कर्णधार म्हणून नेतृत्व केले आहे.२०१२ च्या स्पर्धेत त्याने हैद्राबादकडुन सर्वाधिक धावा केल्या होत्या.
२०१३ ची चॅम्पियन ट्रॉफी,धवनला पुन्हा एकदा एकदिवसीय संघात स्थान मिळाले. या स्पर्धेत नवीन सलामी जोडी उतरवली ती म्हणजे धवन आणि रोहित शर्मा.या स्पर्धेत या सलामी जोडीने पाच सामन्यात दोन शतकी व दोन अर्धशतकी सलामी भागीदारी केल्या.तसेच धवनने या स्पर्धेत दोन शतके व एका अर्धशतकाच्या मदतीने सर्वाधिक धावा केल्या. त्यानंतरही धवनची बॅट तळपतच राहिली. २०१३ सालची मायदेशातील ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका भारताच्या पहिल्या तीन फलंदाजांनीच गाजवली यात धवनने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली.
      धवनने जसे एकदिवसीय सामन्यात सातत्य राखले तसे त्याला कसोटीत राखता आले नाही. इंग्लंड दौऱ्यात ६ डावात त्याला फक्त ३७ धावा करण्यात यश आले. त्यामुळे त्याला उर्वरीत सामन्यात बाहेर बसावे लागले. श्रीलंकेविरुद्धच्या मायदेशातील एकदिवसीय मालिकेत सातत्य राखत एका शतकासह दोन अर्धशतके झळकावली. विश्वचषकापुर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत धवनला पुन्हा एकदा अपयश आले आणि त्याच्या जागी के एल राहुलला संधी देण्यात आली. कसोटीतील अपयश विसरुन त्याने २०१५ च्या विश्वचषकात भारताकडुन सर्वाधिक धावा काढण्याचा मान मिळवला.
             विश्वचषकानंतर झालेल्या बांग्लादेशदौऱ्यात त्याने कसोटीत १७३ धावांची खेळी केली तसेच श्रीलंकेत झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. २०१६ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत धवन पहिल्या दोन सामन्यात अनुक्रमे ९ व ६ धावा काढता आल्या पण पुढील तीन सामन्यांत त्याने १ शतक व २ अर्धशतक झळकावले. चौथ्या सामन्यात १२६ धावांची खेळी करत कोहलीसोबत दुसऱ्या गड्यासाठी २१२ धावांची भागिदारी केली पण त्यानंतर बाकीच्या फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला २५ धावांनी पराभव स्विकारावा लागला. एकदिवसीय मालिकेनंतरच्या टी-२० मालिकेत धवन एकदिवसीय मालिकेतल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात अपयशी ठरला. तसेच त्यानंतरच्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत ५१ व नाबाद ४६ धावांची खेळी करत मालिका विजयात महत्त्वाची भुमिका पार पाडली तर आशिया चषकाच्या बांग्लादेशाविरुद्धच्या अंतिम सामन्यात ६० धावांची खेळी केली.
      आशिया चषकानंतर भारतात झालेल्या टी-२० विश्वचषकात धवन पुर्णपणे अपयशी ठरला त्यामुळेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या उपांत्य सामन्यात धवनच्या जागी रहाणेला संधी मिळाली. तर वेस्टइंडिज दौऱ्यातील पहिल्या सामन्यातील ८४ धावा सोडल्यास धवन २० धावांचा टप्पाही गाठु शकला नाही. त्यानंतर न्युझिलंडविरुद्धच्या कसोटी संघात धवनचा समावेश होता पण त्याच्या जागी राहुलला संधी दिली परंतु दुसऱ्या सामन्यापुर्वी राहुल दुखापतग्रस्त झाल्याने धवन दुसऱ्या कसोटीत खेळला त्यात तो अपयशी ठरला आणि स्वत: दुखापतग्रस्त झाला व उर्वरीत मालिका आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागले. सद्यस्थितीत भारताकडे एकदिवसीय सामन्यांसाठी रोह्त शर्मा, राहुल, रहाणे तर कसोटीसाठी विजय, राहुल आणि गरज पडल्यास पुजाराही सलामीला खेळु शकतो त्यामुळे धवनला जर येणाऱ्या ऑस्ट्रेलिया, बांग्लादेशविरुद्धच्या आणि त्यानंतर चॅम्पियन ट्रॉफीच्या संघात स्थान मिळवायचे असेल तर त्याला कामगिरीसोबतच तंदरुस्तीवर सुद्धा लक्ष द्यावे लागेल.आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये त्याला आयपीएल सारखी कामगिरी करता आली नाही. सद्य स्थितीत भारताकडे कसोटीसाठी सलामी खेळाडु आहेत त्यामुळे धवनला जर कसोटी संघात स्थान टिकवायचे असेल तर कसोटीतील कामगिरी सुधारावी लागेल.

No comments:

Post a Comment