Sunday 21 August 2016

भुवनेश्वर कुमार

सध्याच्या भारतीय संघातील मर्यादित षटकांसाठीचा महत्त्वाचा खेंळाडू.एखाद्याजलदगती गोलंदाजाने ५० षटकांच्या सामन्यात सलग १० षटंक टाकण्याची क्षमतातसेच त्याच्या स्विंगने फलंदाजाच्या मनात धडका भरते. तसे पाहिले तरभुवनेश्वर कुमारला जलदगती गोलंदाज म्हणने म्हणजे वसीम अक्रम, ब्रेट ली वशोएबअख्तर यांसारख्या गोलंदाजाचा अपमान पण तरीही भुवनेश्वर कुमारने कमी वेळातआंतरराष्ट्रीय स्थरावर आपले नाव कमावले. उत्तरप्रदेशातील मेरठ मध्येजन्मलेल्या भुवनेश्वरने देशांतर्गत स्पर्धांत उत्तरप्रदेशचे नेतृत्व केले.पहिल्यांदा भुवनेश्वरचे नाव आले ते दुलिप ट्रॉफीत मध्य विभागाकडुन खेळताना.उत्तर विभागविरुद्ध खेळताना उपांत्या सामन्याचा फासा पलटवला तसेच २००८-०९च्या रणजी ट्रॉफीतील अंतिम सामन्यात सचिन तेंडुलकरला देशांतर्गत स्पर्धांतशुन्यावर बाद करणारा पहिला गोलंदाज ठरला.
भुवनेश्वरकुमारची भारतीय संघात पहिल्यंदा वर्णी लागली ती २०१२ मध्येपाकिस्थानविरुद्ध मायदेशात झालेल्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत. भुवनेश्वरकुमारने आपल्या पदार्पणाच्या टी-२० आणि एकदिवसीय सामन्यात पहिल्याच चेडूवरगडी बाद केला. या मालिकेत त्याला ज्याप्रकारे स्विंग मिळत होता व फलंदाजबाद केले ते पाहता भुवनेश्वर भारताला आवश्यक असलेल्या गोलंदाजाची जागा घेऊशकतो असे वाटत होते. याच कामगिरीच्या जोरावर त्याला २०१३ साली भारतातझालेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेत त्यात त्याने सुरुवातीला गडी बाद करुनअश्विन व जडेजाला चांगला साथ दिली.गोलंदाजी बरोबरच त्याने फलंदाजीत सुद्धाआपले योगदान दिले. पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने महेंद्रसिंग धोनीसोबतनवव्या गड्यासाठी १४० धावांची भागीदारी केली व पहिल्या डावात मोठी आघाडीमिळवुनदिली.
भारताला २०१३ ची चॅम्पियन ट्रॉफी जिंकवण्यातही त्याने ठसा उमटवला.त्यानंतरवेस्ट इंडिजमध्ये झालेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेत ८ धावा देत ४ बळी घेऊनश्रीलेकेविरुद्ध आपली एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च कामगिरी बजावली यातत्यानेमालिकारवीर पुरस्काराला गवसणी घातली.मर्यादित षटकांच्या सामन्याप्रमाणेत्याला कसोटीत बळी मिळवण्यात आपयश येत होते पण फलंदाजीत तो आपली भुमिकाबजावत होता.पण याला अपवाद ठरली २०१४ इंग्लंड विरुद्धची मालिका. या मालिकेतत्याने भारताकडुन सर्वाधिक बळी घेतले तसेच फलंदाजीत सुद्धा तीन अर्धशतकेझळकावली. त्यात लॉर्डसच्या कसोटीमध्ये त्याने जडेजासोबत केलेली ९९ धावांचीमहत्त्वाची भागिदारी केली व इंग्लंडला मोठे लक्ष्य दिले. भुवनेश्वर २०१५च्या विश्वचषकात महत्त्वाचा ठरणार होता परंतु तंदरुस्ती त्याला अंतिम ११खेळाडूंमध्ये संधी मिळवण्यात अडथळा ठरत होती. त्याने फक्त एक सामना खेळलापण तो त्याच्याशैलीतदिसलानाही.
      मायदेशात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० व एकदिवसीय मालिकेतभुवनेश्वरला सपशेल अपयश आले.टी-२० मध्ये तर त्याला एकही गडी बाद करता आलानाही आणि एकदिवसीय मालिकेत त्याने ७ गडी बाद केले त्यासाठी त्याला मोठ्याधावामोजायला लागल्या. शेवटच्या सामन्यात तर त्याने एक गडी बाद करत तब्बल १०६धावा दिल्या. कसोटी सामन्यात त्याला संधी मिळालीच नाही.२०१६ च्याविश्वचषकात त्याला संघामध्ये स्थान मिळाले नाही पण आयपीएल मध्ये स्रर्वाधिक२३ बळी घेऊन संघाला विजेतेपद मिळवुन दिले.आयपीएल नंतरच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील पहिल्या दोन सामन्यात बाहेर बसल्यानंतर त्याला तीसऱ्या सामन्यात उमेश यादवच्या जागी खेळण्याची संधी मिळाली आणि संधीचा फायदी उठवत पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात १ बळी घेतला. पहिल्या डावातील त्याच्या गोलंदाजीचे पुथ:करण २३.४-१०-३३-५ असे होते आणि त्याने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना पुर्णपणे जखडुन ठेवले होते. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या अमेरिकेत झालेल्या टी-२० मालिकेतही तो अपयशी ठरला.

      मायदेशात न्युझिलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील एकाच सामन्यात भुवनेश्वरला संधी मिळाली त्यात ४८ धावांत ५ व २८ धावांत १ अशी कामगिरी केली तर दुखापतग्रस्त असल्याने कसोटी मालिकेनंतरच्या एकदिवसीय मालिकेत खेळू शकला नाही. दुखापतीतुन बाहेर आल्यानंतर त्याचा इंग्लंडविरुद्धच्या कसेटी मालिकेसाठीच्या संघात समावेश करण्यात आला पण पहिल्या तीन सामन्यात त्याला संधी मिळाली नाही परंतु मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्याने भुवनेश्वरचा संघात समावेश झाला तो मुंबईच्या सामन्यात त्यात त्याला १ गडी बाद करता आला. ज्याप्रकारे आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केल्यानंतर भुवनेश्वर त्याच्या स्विंग गोलंदाजीमुळे प्रकाश झोतात आला पण वेग वाढवण्याच्या नादात त्याची स्विंग गोलंदाजी हरवल्यासारखी वाटते. तसेच त्याची स्विंग गोलंदाजी त्याच्या आधीच्या वेगावरसुद्धा घातकच होती त्यामुळे स्विंग सोडुन फक्त वेगावर लक्ष देणे तर चूकिचेच आहे त्याचसोबत त्याला संघातील स्थान टिकवणे सुद्धा आवघड आहे.
शंतनु कुलकर्णी

No comments:

Post a Comment